भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा देत 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. मध्य आणि हार्बर मार्गांवर लोकल ट्रेन सेवा उशिराने धावत होत्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मान्सून नियंत्रण कक्ष सक्रिय केले असून नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.